Eknath Shinde : वीर सावरकरांच्या विरोधात जे बोलले त्यांच्यात सहभागी होत आहेत, हे दुर्दैव; मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टिका

90
Eknath Shinde: वीर सावरकरांच्या विरोधात जे बोलले त्यांच्यात सहभागी होत आहेत, हे दुर्दैव; मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टिका
Eknath Shinde: वीर सावरकरांच्या विरोधात जे बोलले त्यांच्यात सहभागी होत आहेत, हे दुर्दैव; मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टिका

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त शिवाजी पार्कवर इंडि आघाडीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसोबत शिवाजी पार्कमधून देशाला संबोधित करणार असल्यामुळे आजचा दिवस हा शिवसेनेसाठी काळा दिवस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवाजी पार्कमधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले त्याच शिवाजी पार्कवरील मैदानात इंडिया आघाडीची सभा होत आहे. वीर सावरकरांच्या विरोधात ते बोलले आणि ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले, यात ते सहभागी होत आहेत, हे दुर्दैव आहे, आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवील, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

(हेही वाचा – Bharat Jodo Nyay Yatra: सभा काँग्रेसची, गर्दी शिवसेनेची !)

सभा विराट होणार असल्याचा दावा
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. रविवारी शिवाजी पार्कवर इंडि आघाडीची बैठक होणार आहे. या सभेच्या माध्यमातून इंडि आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे. या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री डीएमके नेते एम. के स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा विराट होणार असल्याचा दावा, सभेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.