Uday Samant : शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत; उदय सामंत यांचे टिकास्त्र

Uday Samant : शिवाजी पार्क वर होणाऱ्या परिवारवादी मेळाव्यात आघाडीने उद्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान उदय सामंत यांनी इंडिया आघाडीला दिले आहे.

130
Uday Samant : शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत; उदय सामंत यांचे टिकास्त्र
Uday Samant : शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत; उदय सामंत यांचे टिकास्त्र

बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचे आणि पुढे नेण्याचे काम शिवसेना पक्ष करीत आहे. मात्र बाळासाहेबांनी ज्या वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार तेवत ठेवला, त्या सावरकरांचा अपमान करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या राहुल गांधी यांना पंतप्रधान पदी बसविण्यासाठी उबाठा शिवसेनेची (Shiv Sena) काँग्रेस (Congress) करायला उद्धव ठाकरेंची केविलवाणी धडपड सुरू असल्याचा घणाघात शिवसेना उपनेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

(हेही वाचा – Eknath Shinde : हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

सर्वांचा सन्मान ठेऊन जागावाटप होईल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना पक्ष मार्गाक्रमण करीत आहे. येत्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन दिवसांत जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष, सर्वांचा सन्मान ठेऊन लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटप होईल. ४ जून रोजी मतमोजणीतून जनता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावर बसवेल, पुन्हा एकदा देशाला न्याय देणारे नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रामध्ये स्थापन होईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा

महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार तयार आहेत. उद्या शिवाजी पार्क वर होणाऱ्या परिवारवादी मेळाव्यात आघाडीने उद्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी इंडिया आघाडीला दिले आहे. गांधी यांना उद्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कोण आणत आहे आणि ते वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाकडे पाठ करून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतील, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे टिकास्त्र मंत्री सामंत (Uday Samant) यांनी सोडले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.