Central Railway : रेल्वे अपघाती मृत्यूंमध्ये घट; मुंबईकरांचा लोकल प्रवास होतोय सुरक्षित

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान ४४ जीव वाचवले आहेत त्यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी ही आधिक सुरक्षित होत आहे.

110
Central Railway : रेल्वे अपघाती मृत्यूंमध्ये घट; मुंबईकरांचा लोकल प्रवास होतोय सुरक्षित
Central Railway : रेल्वे अपघाती मृत्यूंमध्ये घट; मुंबईकरांचा लोकल प्रवास होतोय सुरक्षित

रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचारी रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर आहेत आणि चोवीस तास जागरुक आहेत. तसेच नियमित कर्तव्य बजावताना इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे प्रवाशांचे प्राणही वाचवले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातात १३४  ने घट झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.  (Central Railway)

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी “मिशन जीवन रक्षक” या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ४४ लोकांचे प्राण वाचवले आहेत. या ४४ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचवणाच्या एकूण २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५ घटना, पुणे विभागात ४ तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा व्यवस्था प्रवाशांना देण्यात येते.

(हेही वाचा : Priyanka Gandhi ED : आता प्रियांका गांधी देखील ईडीच्या रडारवर)

रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा मोठा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना देखील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी लोकांचा जीव वाचवला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.