Uddhav Thackeray : हनुमानगढीचे महंत यांची उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका, जो राम का नही हो सका, वो…

अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. श्री राम मंदिर बांधकाम समितीने मंदिर आणि मंदिराशी संबंधित कामांसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. मंदिराच्या बांधकामात गुंतलेल्या मजुरांची संख्याही वाढली आहे. राम मंदिराला आकार देण्यात सुमारे तीन हजार कामगार रात्रंदिवस गुंतलेले आहेत. १० जानेवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची योजना आहे.

291
Uddhav Thackeray : हनुमानगढीचे महंत यांची उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका, जो राम का नही हो सका, वो...

हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.आज बाळसाहेबांचा आत्मा रडत असणार हे नक्की अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले महंत राजूदास महाराज ?
बाळसाहेबांचा आत्मा रडत असणार हे नक्की –

मी हे गर्वाने सांगतो की मी हिंदू आणि सनातनी आहे. आम्ही आजवर कोणाचाही अपमान केला नाही. मात्र हिंदू आणि सनातन धर्म यांच्या विरोधात बोललो की मला नावं ठेवली जातात. पण आज बाळसाहेबांचा आत्मा रडत असणार हे नक्की. कारण आत्ता ज्या प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं त्या राजकारणाला तिलांजली देण्याचे विचार बाळासाहेबांचे होते. राम विद्रोहींबरोबर मिळालेली सत्ता त्यांनी घेतली नसती.

(हेही वाचा – Vijayakanth : दाक्षिणात्य अभिनेते, डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन)

गर्व से कहो हम हिंदू है –

रामाला ज्याने नाकारलं, भाजपचा हा इव्हेंट आहे असं म्हटलं त्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची अवस्था आता काय आहे? त्यांचा पक्ष फुटला, येणारा निधी थांबला, अनेकांना तुरुंगात जावं लागलं. हे सगळं त्यांनी विचारात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे ये बाळासाहेबांचे पुत्र असून असं वागत आहेत याचं वाईट वाटतं. “गर्व से कहो हम हिंदू है” असा ज्यांचा नारा होता त्यांचेच पुत्र रामद्रोही यांच्यासह उभे आहेत. अशी टीकाही राजूदास महाराज यांनी केली.

घमंडी आघाडीच्या लोकांनी म्हटलं की राम काल्पनिक होता. काळे कपडे घालून धरणं आंदोलन ज्यांनी केलं त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेले आहेत अशीही टीकाही राजूदास महाराज यांनी केली.

(हेही वाचा – Central Railway : रेल्वे अपघाती मृत्यूंमध्ये घट; मुंबईकरांचा लोकल प्रवास होतोय सुरक्षित)

जो राम का नही हो सका वो किसी काम का नही –

जो राम का नही हो सका वो किसी काम का नही. महाराष्ट्राच्या लोकांना हे समजलं आहे. त्यामुळे त्यांना (Uddhav Thackeray) निमंत्रण द्यायचं की नाही ही ट्रस्ट ठरवेल. पण त्यांना मुळीच बोलवू नये असा सल्ला महंत राजूदास महाराज यांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.