Clean Air Survey-2023 : नाशिकची हवा झाली प्रदूषित , स्वच्छ हवा सर्वेक्षणात नापास

मुंबई, नागपूरनंतर नाशिक 21 व्या स्थानावर

89
Clean Air Survey-2023 : नाशिकची हवा झाली प्रदूषित , स्वच्छ हवा सर्वेक्षणात नापास
Clean Air Survey-2023 : नाशिकची हवा झाली प्रदूषित , स्वच्छ हवा सर्वेक्षणात नापास

नाशिक (Nashik) म्हणजे स्वच्छ, सुंदर अन् हरित नाशिक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुणे, मुंबईचे (Mumbai) लोक नाशिकला पसंती देतात. मात्र आता नाशिकचं वातावरण सुद्धा बिघडत चाललं असून स्वच्छ हवा सर्वेक्षणातून (Clean Air Survey-2023) हे समोर आले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षणात १३१ शहरांची निवड करण्यात आली होती. या शहरांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. यात नाशिक शहर एकविसाव्या स्थानावर आहे. त्यावरून शहरातील हवा किती प्रदूषित झाली आहे, हे यावरून निदर्शनास आले. तर इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नाशिकला मात्र नव्याने हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (Climate change) मंत्रालयातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित स्वच्छ वायु सर्वेक्षण-२०२३ (किंवा स्वच्छ हवा सर्वेक्षण) स्पर्धा दरवर्षी घेतली जाते.२०२६ पर्यंत वायू प्रदूषण ४० टक्यांपर्यंत कमी करण्यासाठी ‘एन कॅप’ कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी शहरांची निवड करण्यात आली होती. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक क्षेत्र यासोबत अनेक घटकांत वाढ झाल्याने नाशिकच्या हवेची गुणवत्ता (Air quality) सध्या ढासळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान या स्पर्धेत राज्यातील मुंबई व नागपूरनंतर नाशिकचा २१ वा क्रमांक राहिलेला आहे. या स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम साहित्य विल्हेवाट व्यवस्थ‍ा, रस्त्यावर उडणारी धूळ, ग्रीनरी आणि एनकॅप योजने अंतर्गत वायू प्रदूषण घटविण्यासाठी दिलेला निधीचा वापर हे प्रमुख निकष होते. त्यासाठी दोनशे गुण देण्यात आले होते. त्यात नाशिक महापालिकेला १६० गुण मिळाले. तर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये ६१ गुण मिळाले. सर्वाधिक फटका एन कॅप योजनेअंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्यात महापालिका अपयशी ठरला आहे.

(हेही वाचा :G-20 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनरला १७० पाहुण्यांची उपस्थिती )

मागील चार वर्षात या योजनेअंतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी ऐंशी कोटींचा निधी मिळाला असून जेमतेम वीस कोटी निधीही महापालिकेला खर्च करता आला नाही. एकीकडे अपयश पदरी पडले असताना गतवेळेच्या तुलनेत या स्पर्धेत नाशिकची सुधारणा झाली असून वरचा क्रमांक मिळवला यात धन्यता मानत आहे.
दरम्यान इंदूर शहर प्रथम क्रमांकावर राहीलेला आहे. तर आग्रा शहर दुसर्‍या व ठाणे शहर तिसर्‍या स्थानावर आले आहेत. यंदा अधिक प्रभावी योजना राबवून चांगली कामगिरी केली जाईल. स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत मागच्या वेळेपेक्षा नाशिकची सुधारणा झाली असून 21 वा क्रमांक आल्याचे मनपाचे पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत पुढील वेळेस अधिक चांगली कामगिरी केली जाईल. एन कॅप योजनेचा निधी पुढील तीन महिन्यात खर्च करण्याच्या सूचना सर्व विभागाना दिल्या आहेत.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.