संभाजीनगरला विरोध? तुम्हाला औरंगजेब जवळचा की छत्रपती संभाजी राजे?

101

एमआयएम हा पक्ष एकंदर गंडलेला आहे. ओवैसींच्या लहान बंहूने मागे हिंदुंविरोधात घातक विधान केलं होतं. त्यांनी हिंदूंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर ओवैसींनी आपल्या बंधूला मीडिया समोर न येण्याचे आदेश दिले. ओवैसी हे वकील आहे, हुशार आहेत. पण त्यांचा राजकीय पक्ष गंडलेला आहे. त्यांना भारतात मुस्लिमांचं राजकारण करायचं आहे. मुस्लिमांचं संघटन करायचं आहे. कदाचित त्यांना आधुनिक जिनाह बनायचं आहे.

( हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या वाहनासाठी यापुढे ट्रॅफिक अडवले जाणार नाही! कारण… )

जग आत इतकं बदललं आहे की कोणतीही गोष्ट आता लपून राहत नाही. सोशल मीडियामुळे प्रत्येक माणूस इथे उघडा पडतो. बहुसंख्य मुस्लिमांची अवस्था चांगली नाही. शिक्षणाचा आणि अनेक गोष्टींचा अभाव या समाजामध्ये आढळतो. अर्थात याला स्वतः मुस्लिम, कॉंग्रेस आणि मुस्लिम नेते व धर्मगुरु जबाबदार आहेत. आज जग कोणत्या दिशेने जात आहे याकडे यांचं लक्ष नाही, त्यांना अजूनही दीड हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात रममाण व्हायचं आहे.

कुणीही मुस्लिम तरुणांना या मानसिकतेतून बाहेर काढायला तयार नाहीत. उदयपूर मध्ये झालेलं धार्मिक हत्याकांड ही हिंदू समाजासाठी जितकी चिंताजनक बाब आहे त्याहून कैकपटीने मुस्लिम समाजासाठी चिंताजनक बाब आहे. मुस्लिम समाज हेच करत राहणार आहे का? तुम्ही जगा दुसर्‍यांना जगू द्या हा दिव्य संदेश देणारा एकंही नरोत्तम त्यांच्याकडे जन्माला का येत नाही आणि कधीकाळी चुकून आलाच तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचेल का?

छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुस्थानाचे रक्षक

आता संभाजीनगरच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, त्यावरुन त्यांच्यावर हसावं की रडावं हाच प्रश्न सतावतो आहे. औरंगाबाद हे केवळ मुस्लिम नाव नसून ते एका अत्याचारी हुकुमशाहीचं नाव आहे. औरंगजेब बादशाह हा हिंदुस्थानाचा शत्रू होता आणि छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुस्थानाचे रक्षक होते. हा फरक जलील यांना कळत नसेल आणि ओवैसी यांची जलील यांना मूक संमती असेल तर एमआयएम ची राजकीय वाटचाल भयावह वळण घेऊ शकते. अब्दुल कलाम यांच्या नावाला कुणाचाच विरोध नाही याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि मुस्लिमांना बौद्धिकदृष्ट्या आणखी मागास करण्याऐवजी त्यांना भारताच्या विकासात कशाप्रकारे योगदान करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे.

समाज म्हणून हिंदूंनी भारतासाठी सर्वोच्च त्याग केलेला आहे, सर्वोत्तम योगदान दिलेलं आहे. आज हिंदूंच्या खांद्यावर भारत देश उभा आहे. ही संधी मुस्लिम समाजाला नको का द्यायला? त्यांना का मागे ठेवायचं आहे? त्यांना का मागास बनवायचं आहे? या राजकीय अजेंडा अत्यंत घातक असा आहे. त्यामुळे संभाजीनगरला विरोध करुन ते मुस्लिमांना भारताच्या विरोधात उभे करत आहेत हे मुस्लिमांनी लक्षात घेतलं पाहिजे. औरंगजेब हा आपला नाही, संभाजी महाराज आपले आहेत ही एक गोष्ट या समाजाने लक्षात घेतली तर कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.