अमरावतीत तणाव! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

83

आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने, वातावरण तापलं होतं. आता त्यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा 16 जानेवारीच्या मध्यरात्री अचानक हटवण्यात आला. त्यामुळे आता अमरावतीत प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

म्हणून केली कारवाई

रविवारच्या रात्री शिवसेनेने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. दर्यापूर येथीलही पुतळा अनधिकृत असल्यानं शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं हटवला आहे. यामुळे आता दर्यापूर येथे तणाव वाढला आहे.

( हेही वाचा: ‘टेस्ला’ कारच्या गुंतवणूकीसाठी राज्यांमध्ये चढाओढ, पहा ट्विट ! )

पोलिसांचा बंदोबस्त

अमरावती शहरात राजापेठ उड्डाणपुलावरील महापालिकेने पुतळा हटवल्यानंतर, अमरावती शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, अमरावतीच्या ग्रामीण भागातील दर्यापूर येथे देखील मध्यरात्री विनापरवानगी बसविलेला पुतळा हटविल्याने दर्यापूर शहरात सकाळपासून तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आज सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी दर्यापूर बंदची हाक दिलेली आहे. पुतळा हटवल्याने पालिकेचा निषेधदेखील करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दर्यापूर शहरात तैनात करण्यात आलेला आहे. शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये, यासाठी परिस्थितीवर पोलीस लक्ष देऊन आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.