मागील गेल्या दोन वर्षांपासून जगात कोरोनानं थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लढा देण्यासाठी भारतात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे आजचा दिवस भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज कोरोना महामारी विरोधी लसीकरणाला वर्ष पूर्ण होत आहे. या दिवशी देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले, तेव्हापासून कोरोना लसीकरण मोहीम संपूर्ण भारतभऱ सुरू झाली आहे. आत्तापर्यंत देशात कोरोना लसीचे 156.76 कोटी डोस देण्यात आले आहेत, परंतु संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Union Health Minister Mansukh Mandaviya calls India's vaccination drive "the most successful in the world," on #1YearOfVaccination.
India’s cumulative COVID-19 vaccination coverage has exceeded 156.76 crore. More than 66 lakh vaccine doses have been administered in last 24 hrs. pic.twitter.com/vlaAwYmlJc
— ANI (@ANI) January 16, 2022
देशातील 33 टक्के लोकसंख्येचे लसीकरण बाकी
कोरोनाचा कहर सुरू असताना वर्षभरापूर्वी 138 कोटी लोकसंख्येला लस देणे सोपे नव्हते. आज कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे, तेव्हा हा गंभीर आजार रोखण्यात कोरोना लसीकरण मोहिम मोठी भूमिका बजावत आहे. आतापर्यंत 87 कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस मिळाला आहे. म्हणजेच सुमारे एकूण लोकसंख्येपैकी 92 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे.तर, सुमारे 65 कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. म्हणजेच सुमारे 69 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. देशातील 33 टक्के लोकसंख्येचे लसीकरण होणे बाकी आहे.
(हेही वाचा – चला…आता नवी मुंबईकरांचीही प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवसापासून धावणार मेट्रो)
आतापर्यंत 1.25 कोटी मुलांचे लसीकरण
15 ते 18 वयोगटातील सुमारे 80 दशलक्ष लोकांना लसीकरण करायचे आहे, दरम्यान, कीशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1.25 कोटी मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच सुमारे 41 टक्के. या मुलांना दुसरा डोस देणे बाकी आहे. गेल्या सोमवारपासून बूस्टर डोस सुरू करण्यात आला असून, सुमारे तीन लाख लोकांना बूस्टर डोस द्यायचा आहे, त्यापैकी 38 लाख बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community