गोसीखुर्द प्रकल्पामध्ये होणार जलपर्यटन प्रकल्प; काय आहेत वैशिष्ट्ये?

71

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे. या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकासाबाबत मेघदूत निवासस्थानी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलपर्यटन, विशेषतः, दुर्गम भागात कमी वेळेत पर्यटन स्थळाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते आणि अर्थव्यवस्थेवर त्याच्या गुणाकार प्रभावामुळे अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. आज झालेल्या सामंजस्य करारा मूळे गोसीखुर्द जलाशय आणि आसपासच्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे. जगातील बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटन हा मुख्य घटक मानला जातो आणि महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटन विकासावर विशेष लक्ष देत आहे.या सामंजस्य कराराद्वारे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होवून स्थानिक तरुणांसाठी ८०% रोजगार निर्मिती होईल. पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन निर्माण होईल.राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हा करार अत्यंत महत्वाचा आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा सुवर्ण मंदिराची पुन्हा एकदा चर्चा; जर्नेलसिंग भिंद्रनवालेनंतर आता अमृतपाल सिंग )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.