मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी राज्य सरकारने तात्पुरती टोलमाफी दिली आहे. ही टोलमाफी केवळ शनिवार, २७ ऑगस्ट या दिवसापुरती असणार आहे. त्यामुळे विकेंडला आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
फक्त आजच्या दिवसासाठी टोलमाफी
सध्या या महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरु आहे, त्यामुळे महामार्ग २ तास काही विशिष्ट ठिकाणी बंद करून वाहनांना मुंबई-पुणे जुन्या रस्त्याकडे वळवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले आहेत. शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहनांना तूर्तास टोल आकारु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. दिवसभरासाठी ही टोलमाफी असणार आहे. शनिवारी विकेंडच्या दिवशी या महामार्गावर वाहतुकीची कोंडी ही ठरलेलीच असते. त्यात महामार्गावर सुरु असेलले काम पाहता, ही कोंडी अधिकच वाढली आहे. सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community