Maratha Reservation : सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा; मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची विनंती

74
Maratha Reservation : सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा; मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची विनंती
Maratha Reservation : सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा; मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची विनंती

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले. (Maratha Reservation) मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना जे आरक्षण दिले होते, ते उच्च न्यायालयात टिकले होते. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम चालू आहे.मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सरकारला सहकार्य करावे. मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. सकल मराठा समाजाने शांतता प्रस्थापित करून राज्यसरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा आरक्षण प्रश्नावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर निवेदन केले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते उपस्थित होते. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Electoral Bonds : राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

हिंसाचाराच्या घटनांविषयी तीव्र नापसंती 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सर्वपक्षीय ३२ नेत्यांची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत  मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी विस्तृत चर्चा झाली. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच आरक्षण देता येईल. या प्रश्नी सर्व पक्ष एकत्रित काम करायला तयार आहेत. कायदा कोणीही हाती घेऊ नये. हिंसाचाराला समर्थन नाही. सर्वपक्षीय  नेत्यांनी मराठा आरक्षणात होत असलेल्या जाळपोळ, तोडफोड या घटनांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे मराठा समाजाचे शांत आंदोलनाला गालबोट लागले आहे. (Maratha Reservation)

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी यापूर्वी दिलेले पर्याय फेटाळले आहेत. सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीवर ते ठाम आहेत.  (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.