Uday Samant : उद्धव ठाकरेंना पाच मिनिटात भाषण उरकावं लागणं दुःखदायक; उदय सामंत यांचा टोला

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कालच्या मेळाव्यात उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. मात्र अन्य पक्षांच्या नेत्यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील आपल्या भाषणात केला नाही.

149
Uday Samant : उद्धव ठाकरेंना पाच मिनिटात भाषण उरकावं लागणं दुःखदायक; उदय सामंत यांचा टोला

रविवारचा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची काही आवश्यकताच नव्हती. २५ पक्षांनी एकत्र येवून सुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून कालचा इंडी आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याची सणसणीत टीका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सोमवारी (१८ मार्च) बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना आपल्या भाषणासाठी फक्तं पाचच मिनिट देण्यांत आली हे अत्यंत दुःखदायक असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (Uday Samant)

कालच्या इंडी आघाडीच्या मेळाव्यावरून आज मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांवर सडकून टीकाही केली. ते म्हणाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे जेव्हा याच शिवाजी पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्याच्या सभेमध्ये असते, असाही टोला सामंत यांनी लगावला. (Uday Samant)

मंत्री सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले की, कालच्या मेळाव्यात उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. मात्र अन्य पक्षांच्या नेत्यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील आपल्या भाषणात केला नाही. अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही. इंडी आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या पण भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करणे, एवढेच या मेळाव्यात सुरु होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडी आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले. त्यामुळे आमच्या महायुती सरकारला कुणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले असून महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Uday Samant)

(हेही वाचा – Indian Navy: भारत-अमेरिका यांच्या संयुक्त सरावाला प्रारंभ)

भाषण ४५ वरून ५ मिनिटात उरकावं लागलं…

यापूर्वी शिवसेना अखंड असताना याच शिवाजी पार्कमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे भाषण शेवटचे असायचे. त्यांच्या पश्च्यात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले त्यावेळेस ते ४५ मिनिटे भाषण करायचे. पण कालच्या इंडी आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचना केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली, हे अतिशय दुःखदायकच असून कुणाला वाटो न वाटो पण आमच्यासाठी ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमय होऊन नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काम करेल अशी शक्यता निर्माण झाल्याचे भाकितही सामंत यांनी वर्तविले. (Uday Samant)

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हिन दर्जाची टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ बसून आपण काय साध्य केले याचे उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनतेसमोर द्यावे लागेल. मला फक्त पाच प्रश्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांना विचारायचे आहेत की, याच शिवाजी पार्कवर दिवंगत बाळासाहेब भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो अशी करत असत. मग कालच्या मेळाव्यात भाषणाची सुरुवात अशी का झाली नाही..?, पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला लेख ज्यावेळेस काँग्रेसच्या एका नेत्याने फाडला होता. त्यावेळेस दिवंगत बाळासाहेबांनी संपूर्ण देशात जोडे मारो आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सावरकर हे क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर होते, असे तुम्ही ठणकावून सांगणार आहात का…..? काल राहुल गांधी दिवंगत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गेले, पण त्याच्याच बाजूला असेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत, पण ते गेले नाहीत म्हणून महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी सुद्धा सावरकरांचा विचार सोडला आहे का…? दिवंगत बाळासाहेबांनी सांगितले होते की, भविष्यात काँग्रेसच्या सोबत जाण्याची वेळ आल्यास मी शिवसेनेचे दुकान बंद करेन, याबद्दल खुद्द प्रमुख व उबाठा नेते शिवसैनिकांना उत्तर देणार का…? संपूर्ण देशात समान नागरिक कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असून तो कायदा लागू होणार आहे, त्याचे समर्थन ठाकरे गटाचे प्रमुख करणार का….? आणि काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे. त्याचे समर्थन कालच्या मेळाव्यात राहुल गांधींसोबत बसलेले सर्वपक्षीय नेते करणार का….? अशा प्रश्नांची सरबत्तीही सामंत यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Uday Samant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.