“माझ्या राजीनाम्याच्या बातम्या अफवा आहेत; मीच मुख्यमंत्री राहणार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

180
"माझ्या राजीनाम्याच्या बातम्या अफवा आहेत; मीच मुख्यमंत्री राहणार" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजेच बुधवार ५ जुलै रोजी एक महत्त्वाची बैठक घेतली. शिंदे गटाचे सर्व आमदार या बैठकीत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. अजित पवार यांच्या येण्याने शिंदी गट नाराज असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. अशातच ठाकरे गटाकडून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उत्तर दिलं आहे. “माझ्या राजीनाम्याच्या बातम्या ही एक अफवा आहे, मीच मुख्यमंत्री आहे आणि राहणार आहे.” अशा भाषेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

(हेही वाचा – मणिपूर हिंसाचार : १० जुलैपर्यंत इंटरनेट सेवा बंद)

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी राजीनामा देणार नाही. माझ्या राजीनाम्याची बातमी कोण पसरवत आहे हे मला माहीत आहे, पण या फक्त अफवा आहेत. ज्या ५० आमदारांनी मला पाठिंबा दिला, त्यांची साथ मी कधीच सोडणार नाही. २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त जागा आपल्याला लढवायच्या आहेत. आपण ५० जागा जिंकून आणू त्यावर फोकस करा, असा कानमंत्र शिंदेंनी यावेळी आमदारांना दिला.

सरकारवर माझाच कंट्रोल 

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, “येत्या २०२४ मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे. अजित पवार आपल्यासोबत आल्याने चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्रीपद अजूनही माझ्याकडेच आहे, आणि सरकारवर माझाच कंट्रोल आहे. अजित पवार यांना सरकारमध्ये घेणं हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वगळून ही युती झाली आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही.’

मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही – उदय सामंत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि त्यांच्या गटाने सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.