उद्धव ठाकरेंना २० पावले चालले तरी दम लागतो; नारायण राणेंचा हल्लाबोल

98

आता शिवसेना संपली आहे, काही राहिलेले नाही. निवडणुकीपर्यंत उरलेले १५ जणही त्यांच्याकडे राहत नाहीत. पक्षाची वाताहत नाही तर याताहत झाली आहे. उद्धव ठाकरे यांची ताकदच नाही. मंत्रालयात यायची ताकद नव्हती. २० पावले चालू शकत नाही आणि घणाघात केला अशी बातमी पत्रकार देतातच कसे? आक्रमक शिवसैनिकांमुळे शिवसेना घडली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कुणाला कानफटातही मारली नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

पूर्वी शिवसेनेची सभा आयोजित केली जायची, खेडला शिवसेनेची सभा आयोजित केली की सगळेजण जायचे. आता सभेचे आयोजन होत नाही. मुंबईवरून इतके, रायगडवरून इतके, रत्नागिरीवरून इतके. दोन खुर्च्यांमध्ये ५-६ माणसे झोपतील इतकी जागा सोडली होती आणि म्हणे विराट सभा. खेडची सभा काही विराट वगैरे नव्हती. स्थानिक माणसे सभेला नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार, त्यांनी अडीच वर्षांत काही केले नाही. ते लोकांना काय सांगणार? कोकणात अतिवृष्टी झाली होती, त्याचे पैसे अद्याप आले नाहीत. काय दिले कोकणाला? कोणत्या नवीन योजना कोकणाला दिल्या? त्या माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार?, असेही केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.

(हेही वाचा पाठ्यपुस्तकांच्या बदलाच्या निर्णयात ‘बदल’; पुढच्या वर्षी कशी असणार पुस्तके?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.