Maratha Reservation : सध्याचे सरकार खोटारडे नाही; देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत – संभाजी भिडे

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जिवाचा आकांत करु

128
Maratha Reservation : सध्याचे सरकार खोटारडे नाही; देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत - संभाजी भिडे

एकीकडे मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेली ४ दिवसांची मुदत संपताच (Manoj Jarange Patil) उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (१० सप्टेंबर) सलाइन काढली तसेच पाणी पिणेही बंद केले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवार ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर आता शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी तुमचा लढा योग्य आहे. सध्याचे सरकार खोटारडे नाही. एकनाथ शिंदे खोटं बोलणारे नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, असा शब्द जरांगे पाटील यांनी दिला.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलतांना, “मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) तुमचा लढा योग्य आहे. सध्याचे सरकार खोटारडे नाही. एकनाथ शिंदे खोटं बोलणारे नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. पण, एक घाव दोन तुकडे करण्यासारखा हा विषय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुंरधर आहेत. ते धोका देणार नाहीत. ते आपला शब्द पाळतील.” असं संभाजी भिडे म्हणाले.

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; लवकरच घेणार पुढचा निर्णय)

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं

पुढे बोलतांना संभाजी भिडे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी जिवाचा आकांत करु. मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. हवं ते मिळवून देण्याची जबाबदारी मला द्यावी. सरकारमधील तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती संभाजी भिडे यांनी केली.

आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत

मराठा समजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळालंच पाहिजे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. मी दिखाव्यासाठी येथे आलो नाही. शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. तुम्ही जे करताय ते योग्य आहे. राजकारण्याच्या हाती हा प्रश्न आहे. आता जे सरकार सत्तेत आहेत ते अजिबात लबाड नाही, असं संभाजी भिडे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.