Girish Mahajan : ५० चे ५ उरले तरी मस्ती जात नाही; गिरीश महाजन यांची संजय राऊतांवर टीका

765
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्याकडे 50 चे 5 राहिले आहेत, ते देखील आता राहणार नाही, तरी तुमची मस्ती जात नाही, असे म्हणत भाजपचे नेते तथा मंत्री  गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे कचऱ्याच्या डंपरमध्ये बसलेले असल्याचे म्हटले होते. फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते हे कचऱ्याचे डंपर असून ते पुढे गुजरातमध्ये जाणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. संजय राऊत यांच्या या टीकेला आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्याकडे आता कोणीच राहिले नाही, त्यामुळे बिचाऱ्यांचा तोल जात असल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यांचा डोक्याचा आता इलाज करायला हवा, असे देखील गिरीश महाजन (Girish Mahajan)  यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.