अनिल देशमुखांना जामीन नाकारला, तुरूंगातील मुक्काम वाढला

90

विविध गुन्ह्यांखाली सध्या आर्थर रोडमध्ये गजाआड आहेत. याप्रकरणी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असता त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. हा राज्य सरकारलाही मोठा झटका मानला जात आहे.

100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आरोप झाल्यानंतर देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. त्यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. तसेच देशमुख यांचीन मालमत्ता जप्तीचा आदेश देण्यात आला होता. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

(हेही वाचा देवबंदचे विचित्र फतवे! पेटीएमची नोकरी, मोबाईलवरील चित्रीकरण, महागडे कपडे हराम…)

नेमके काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.