१९७१ च्या बांगलादेशमुक्ती युद्धाच्या विजयदिनाचा यावर्षी सुवर्णमहोत्सव!

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी जाग्या केल्या त्यावेळच्या आठवणी

88

भारत-पाकिस्तान यांच्यात बांगलादेशमुक्तीसाठी झालेल्या १९७१ च्या युद्धाला येत्या १६ डिसेंबरला ५० वर्षे होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी दिनानिमित्त त्या विजयदिनाची आठवण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी रविवारी ५ डिसेेंबर २०२१ या दिवशी जागृत केली. १९७१ च्या या युद्धातील भारतीय सशस्त्रदलाचा देदिप्यमान असा विजय या वर्षी तो स्वर्णिम विजय दिन म्हणूून तो साजरा होत आहे. या निमित्ताने महाजन यांनी या युद्धातील तयारी कशी होती, नियोजन कसे केले होते आणि युद्ध जिंकण्यासाठी मानसिक आणि प्रत्यक्षातील तयारी कशी केली होती, त्याची माहिती रविवारी या ऑनलाईन व्याख्यानात दिली.

ब्रिगेडियर महाजनांनी केल्या आठवणी जाग्या

पाकिस्तानमधील निवडणुका, शेख मुजीबर रहमान यांचा विजय, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि पूर्व पाकिस्तानविरोधातील द्वेषमूलक परिस्थिती अधिक गंभीर बनू लागली होती. त्या पार्श्वभूमीची माहितीही महाजन यांनी दिली. तत्कालिन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी त्या संबंधातील निर्णय घेऊन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांना आदेशही दिले. त्यानंतर युद्धासंबंधात पुढील कार्यवाही सुरू केली गेली. त्यापूर्वी काय स्थिती होती ? पाकिस्तानमध्ये कोणती कारवाई पाकिस्तानी लष्कर करीत होते? कोणत्या प्रकारे पूर्व बंगालींवरही कारवाया सुरू केल्या गेल्या होत्या? असे प्रश्नही होते. त्यावेळच्या या साऱ्या प्रश्नांचा विचार करता एक स्पष्ट दिसले ते म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या सततच्या लष्करी कारवायांमुळे निर्वासितांचे मोठ्या प्रमाणावर भारतात निर्वासन झाले, ज्यांची संख्या सुमारे दहा दशलक्ष इतकी होती. एकंदर ३० दशलक्षाहून अधिक लोक पाकिस्तानात देशांतर्गत विस्थापित झाले. तर बांगलादेश सरकारच्या अंदाजानुसार पाकिस्तानी सैन्याने सुमारे तीस लाख लोक मारले आहे.

(हेही वाचा – तुमचं वायफाय राऊटर ‘या’ कंपनीचं असेल तर सावधान!)

पाकिस्तानने पश्चिमेकडून पूर्व पाकिस्तानात दोन पायदळ तुकड्या एअरलिफ्ट केल्या होत्या आणि सर्व मोठ्या शहरांवर नियंत्रण मिळवले होते. लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी यांनी ११ एप्रिल १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्याची धुरा स्वीकारली होती. जनरल सॅम माणेकशॉ, ज्यांचे मत होते की योग्य नियोजन आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा निर्माण केल्यानंतर कारवाई सुरू केल्या पाहिजे. यासाठी भारतीय सैन्याला खात्रीशीर विजयाच्या तयारीसाठी ६-९ महिने लागतील, असा अंदाज होता. त्यानुसार विविध घटक विचारात घेतले गेले. भारतीय सैन्य पश्चिम पाकिस्तान आणि चीनविरुद्धच्या कारवायांसाठी केंद्रित होते आणि पूर्व पाकिस्तानला सामोरे जाण्यासाठी केवळ आकस्मिक योजना अस्तित्वात होत्या. त्यामुळे पुनर्रचना, प्रशिक्षण, आणि नवीन लॉजिस्टिक पाया तयार करण्यासाठी वेळ आवश्यक होता.

पाकिस्तानशी असणारं युद्ध हे सर्वांगीण युद्ध

पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंत पूर्व पाकिस्तानमध्ये सुमारे चार पायदळ विभाग तयार केले होते. पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्याशी लढण्यासाठी भारताला तशी सक्षम पातळी निर्माण करण्याची गरज होती. मान्सून खंडित होणार होता, ज्यामुळे पूर्व पाकिस्तानच्या नदीच्या प्रदेशात ऑपरेशन्सची प्रगती कठीण होईल. याव्यतिरिक्त, चीनच्या विरुद्ध उत्तरेकडील सीमांवरील ये-जा बंद होईपर्यंत प्रतीक्षा करणे शहाणपणाचे होते. सुरुवातीला वास्तविक भारताच्या बाजूने काही अनुकूल वातावरण नव्हते. त्यामुळे या युद्धासंबंधात भारताला आंतरराष्ट्रीय वातावरण तयार करावे लागले. पाकिस्तानशी युद्ध हे सर्वांगीण युद्ध असेल, तिन्ही लष्करी सेवा यात सामील होतील. यासाठी योग्य नियोजन आणि तयारी आवश्यक होती. असे विविध घटक विचारात घेतले गेले होते, असेही महाजन यांनी माहिती देताना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.