Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही मानतो; प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे हृद्य उद्गार

Govind Dev Giri Ji Maharaj : अनेक पिढ्यांनंतर श्रीराममंदिर उभे राहिले. आता मात्र याच पिढीत आपले राष्ट्र उभे रहात असतांना आपण अनुभवूया. त्याकरता जे साहस लागते, ते करणारे मुख्यमंत्री भेटले. व्यक्तीनिष्ठेपेक्षा तत्त्वनिष्ठा महत्त्वाची असते.

227
Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही मानतो; प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे हृद्य उद्गार
Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही मानतो; प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे हृद्य उद्गार

स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही मानतो. या दोन्ही व्यक्तींनी आपल्याला संदेश दिला आहे. भगूर येथे स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यासाठी स्थान मिळण्यात अडचणी होत्या, तेव्हा ‘जगाला गवसणी घालणारा थोर पुरुष येथे जन्माला आला, त्याला इथे योग्य स्थान दिले नाही, तर पुढच्या पिढ्या तोंडात शेण घालतील’, असे सांगितले. नंतर प्रश्न सुटला. माझ्या विचारांची गंगा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद या दोन तटांमधून वहात गेली म्हणून ती श्रीराममंदिरापर्यंत पोचू शकली. छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर यांची विचारधारा देशाला तारणारी आहे. त्याचे पूजन करण्याचा प्रयत्न आजीवन केला, असे हृद्य उद्गार रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी काढले.

(हेही वाचा – Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत; सुरेश चव्हाणके यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा)

ते १४ जानेवारी रोजी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संपन्न झालेल्या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्यात बोलत होते. (Govind Dev Giri Ji Maharaj) हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार भारतशेठ गोगावले, मंत्री दीपक केसरकर, विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करेल

स्वामीजी पुढे म्हणाले की, बालसंस्कार करणे म्हणजे पुढच्या पिढीमध्ये छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे संस्कार करणे. अनेक पिढ्यांनंतर श्रीराममंदिर उभे राहिले. आता मात्र याच पिढीत आपले राष्ट्र उभे रहात असतांना आपण अनुभवूया. त्याकरता जे साहस लागते, ते करणारे मुख्यमंत्री भेटले. व्यक्तीनिष्ठेपेक्षा तत्त्वनिष्ठा महत्त्वाची असते. विचारांना पुढे नेण्यातच सार्थक आहे. याकरिता छत्रपती शिवाजी महाराज मनात ठेवून जगावे लागते. मी जगाच्या वाङ्मयाचा मागोवा घेतला; पण जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्यासारखी रत्ने नाहीत. महाराष्ट्र यांचा आदर्श घेऊन चालेल, तर महाराष्ट्र पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करेल ! आपले राष्ट्र धर्मासाठी आहे आणि मी धर्मासाठी आहे. परमेश्वराने त्यासाठी मला बळ द्यावे. (Govind Dev Giri Ji Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.