Maratha Reservation : अखेर १७ दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण

117
Maratha Reservation : अखेर १७ दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आज म्हणजेच गुरुवार १४ सप्टेंबर रोजी अखेर मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं. आमरण उपोषण मागे घेतलं असलं तरीही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेतलं. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तिथे उपस्थित होते.

(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा १७वा दिवस, सरकारच्या शिष्टमंडळासोबत मध्यरात्री चर्चा)

आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण (Maratha Reservation) मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.