Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्याच्या कुुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत, तर..

72
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्याच्या कुुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत, तर..

मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनापूर्वीच जालन्यातील ४७ वर्षीय आंदोलनकर्त्याने मुंबईतील वांद्रे पूर्व येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. सुनील बाबुराव कावळे असे या आंदोलनकर्त्याचे नाव होते. या आंदोलनकर्त्याच्या आत्महत्येमुळे मराठा आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशातच खेरवाडी पोलिसांनी (Maratha Reservation) याप्रकरणी अपमृत्युची नोंद करून मृतदेह सायन रुग्णालय येथे शवविच्छेदना साठी पाठवला. पोलिसांना सूळ कावळे याच्या मृतदेहशेजारी असलेल्या बॅगेत ४ पानांची सुसाईड नोट मिळून आली असुन पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. सुनील बाबुराव कावळे हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुका चिकणगाव येथे राहणारे होते. २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी सुनील कावळे हे मुंबईत आले होते. बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सुनील कावळे यांचा मृतदेह वांद्रे पूर्व बीकेसीला कनेक्ट होणाऱ्या उड्डाणपुलावरून खाली गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला.

या सर्व घटनेवर शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणासंदर्भात सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये. शासनाकडून कावळे (Maratha Reservation) यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत दिली जाणार आहेत. तसेच कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल.”

(हेही वाचा – Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; वाहन चालकाला अटक)

केसरकर पुढे म्हणाले की; “ओबीसी समाजाला असलेल्या सर्व सुविधा मराठा समाजाला (Maratha Reservation) दिल्या आहेत. सरकार याप्रकरणी संवेदशील आहे. कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नये. आम्ही कावळे यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबाची ऐकी त्यांना या दु:खातून बाहेर येण्यास मदत करेल. स्व:ताचा जीव देऊन काही मिळत नाही, असं केसरकर म्हणाले.”

“माझी कळकळीची विनंती आहे. सरकार संवेदनशील आहे. अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. पण, काही बाबी (Maratha Reservation) कायद्याच्या कसोटीवर उतराव्या लागतात. यात ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी मुख्यमंत्री स्वत: कामाला लागले आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, कोणीही विपरित पाऊल उचलू नये,” अशी विनंती असल्याचं केसरकर म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.