एप्रिलमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात येणार उष्णतेची लाट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

77

एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्य दिवसांपेक्षा उष्णता वाढणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

( हेही वाचा : दुबईला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग; नक्की काय घडले?)

महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहिल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?

  • पाण्याची बाटली जवळ ठेवा
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, मऊ, कॉटनचे कपडे वापरा.
  • आहारात फळे, ताक, लिंबू पाणी, ज्यूस, सरबत, दही याचा समावेश करा.

काय करू नये?

  • दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
  • मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.