आषाढी यात्रेत ८ लाख ८१ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास

133
आषाढी यात्रेत ८ लाख ८१ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास
आषाढी यात्रेत ८ लाख ८१ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास
आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी पायी वारीसोबतच एसटी बसनेही लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदा एस. टी. महामंडळातर्फे २५ जून ते ५ जुलै या कालावधीत सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या. त्याद्वारे १७ हजार ५६६ फेऱ्यांमधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २७ कोटी ८८ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
आषाढ यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने दिलेल्या ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांसाठी तिकिट दरात ५० टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा मागिल वर्षाच्या तुलनेत ७ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न अधिक मिळाले तर प्रवाशी संख्या २ लाख ४५ हजार ६७० ने वाढली.

किफायतशीर आणि सन्मानजनक सेवेसाठी कटिबद्ध

“प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल!” असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.