वीर सावरकर यांनी आवेदनपत्रे दिली माफीनामा नव्हे – सात्यकी सावरकर

110

वीर सावरकर हे इंग्रजांना माफी मागायचे, त्यासाठी त्यांनी पत्रे लिहिली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांनी जी पत्रे दाखवली ती खरी आहेत. पण त्याला माफीनामा म्हणणे चुकीचे आहे, असे मत वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले.

काय म्हणाले सात्यकी सावरकर? 

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावरील वक्तव्य हे अत्यंत बेजबाबदार आहे. यातून त्यांना राजकीय स्वार्थ साधायचा आहे. सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर सावरकर प्रेमी, हिंदुत्ववादी सगळ्या संघटना पेटून उठल्या आहेत. यातून वीर सावरकर यांचे आणखी नवीन अभ्यासक तयार होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या टीकेमुळे एका बाजूला दुःख होत असले तरी दुसरीकडे यामुळे आनंद होत आहे. त्यातून सावरकरप्रेमींना स्फूर्ती मिळत आहे, असेही सात्यकी सावरकर म्हणाले. वीर सावरकर हे अंदमानात गेले होते. त्यावेळी त्यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा पुरविल्या नव्हत्या. एका कोठडीत त्यांना बंद करून ठेवले होते. सामान्य बंदीवानाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी पत्र लिहिली होती, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले. राजकीय बंदीवानाला ज्या सुविधा असतात, त्या मिळाव्यात म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांनी फक्त माझी सुटका करा, असे म्हटलेले नाही. बंगालचे क्रांतिकारक, गदर चळवळीचे लोकं जे अंदमान निकोबारमध्ये आहेत. त्यांना सोडा, असेही त्यांनी म्हटले आहे. पेन्शन मिळविण्यासाठी सावरकर काय सरकारी नोकर होते का, असा सवाल करत ब्रिटिश त्यांना निर्वाह भत्ता देत होते असेही सात्यकी सावरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.