‘The Kerala Story’ चित्रपटाला विरोध करणारे पक्ष दहशतवादाला समर्थन करतात – अनुराग ठाकूर

146
'The Kerala Story' चित्रपटाला विरोध करणारे पक्ष दहशतवादाला समर्थन करतात - अनुराग ठाकूर
'The Kerala Story' चित्रपटाला विरोध करणारे पक्ष दहशतवादाला समर्थन करतात - अनुराग ठाकूर

सध्या ‘द केरळा स्टोअरी’ (The Kerala Stroy) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण या चित्रपटाला विरोध करत आहेत, तर काही जण या चित्रपटाचे समर्थन करून कौतुक करत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘द केरळा स्टोअरी’ या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

हरियाणात रविवारी, ७ मेला अनुराग ठाकूर बोलत होते. ते म्हणाले की, ‘द केरळा स्टोअरी’ फक्त एक चित्रपट नसून त्यातून एक मोठे षडयंत्र उघडकीस आले आहे. असे काही लोक आहेत, ज्यांना आपल्या धर्मातील मुलींना आमिष दाखवून दहशतवादाच्या मार्गावर आणायचे आहे, त्यांचा चेहरा ‘द केरळा स्टोअरी’ चित्रपटाच्या कथेतून उघड झाला आहे. काही राजकीय पक्ष या चित्रपटाचा विरोध करत आहे. जर ते विरोध करत आहेत तर ते पीएफआय, दहशतवाद, आयएसआयएस याला समर्थन करत आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाविषयी बोलत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘दहशतवादी कटावर आधारित ‘द केरळा स्टोअरी’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. असे म्हटले जाते की, केरळा स्टोअरी फक्त एका राज्यातील झालेल्या दहशतवादी कटावर आधारित आहे. देशातील ऐवढे सुंदर राज्य, जिथले लोकं खूप मेहनती आणि प्रतिभावान आहे, अशा केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटातून करण्यात आला आहे. बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलचे आवाज तर ऐकू येतात, पण समाजाला आतून पोकळ करत असलेल्या दहशतवादी कटाचा आवाज येत नाही. न्यायालयानेही या दहशतवादी कटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.’

(हेही वाचा – The Kerala Story : अमरावतीत कोणतेही विरोध, निदर्शने नाहीत, पोलिस बंदोबस्तात ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित)

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशाचे दुर्दैव बघा की, काँग्रेस आज समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी उभी दिसत आहे. इतकेच नाही तर अशा दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजीही करत आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला हे करताना पाहून मला आश्चर्य वाटत आहे. कर्नाटक राज्य देशातील नंबर-१ राज्य बनवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची गरज आहे. कर्नाटक दहशतवादापासून मुक्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहशतवादीविरोधात भाजप नेहमीच कठोर राहिला आहे. मात्र जेव्हा जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा मात्र काँग्रेसच्या पोटात दुखत,’ असा टोला मोदींनी लगावला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.