Devendra Fadanvis : तीन ते चार लोकांमुळे ठाकरे गट असंतुष्ट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना माहित आहे की, त्यांचा पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.

118

संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे असंतुष्ट असून त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी, 30 मे रोजी ठाकरे गटातील अस्वस्थतेवर भाष्य केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील २२ आमदार आणि ९ खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी ठाकरे गटाविषयी सूचक भाष्य केले. आज  संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे की त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असे ते म्हणाले.

(हेही वाचा PFI चेच काम वेगळ्या नावाने सुरू! हिंदुत्वनिष्ठ नेते, पत्रकार दहशतवाद्यांच्या रडारवर)

शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना माहित आहे की, त्यांचा पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. मात्र अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.