Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे

78
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे

गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात पक्ष (Maharashtra Politics) आणि निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू आहे. याप्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. मात्र यादरम्यान आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असल्याने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज म्हणजेच शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष यांची कानउघाडणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

आज ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी (Maharashtra Politics) घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असंही सरन्यायाधीश म्हणाले आहेत. पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे.

(हेही वाचा – Yogi Adityanath : आतंकवादाचे समर्थन खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री योगींचा इशारा)

सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश (Maharashtra Politics) सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल, असंही सरन्यायाधीश सुनावणीदरम्यान म्हणाले. (Maharashtra Politics)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.