पडळकरांचे आता राज्यभर वीज तोडणीच्या विरोधात आंदोलन

96

शेतक-यांवर आलेल्या अस्मानी संकटावर सरकारने कुठलीही मदत केली नाहीच, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. मुख्यमंत्रीही वर्षाच्या बाहेर पडायला तयार नव्हते. अव्वाच्या सव्वा वीजबिल सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याच वेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

गोपीचंद पडळकर यांनी वीज तोडणीवरून सरकारवर जोरदार हल्ला केला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीने घेतला आहे. दोन-दोन, चार-चार वर्षांमागील वीजबील, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणे, यात अनेक त्रुटी व अनियमितता आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यानीशी वीजबिलाच्या संदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशाराही पडळकरांनी दिला. ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे आणि ते आपापल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे सूपूर्द करून पोचपावती घ्यावी, असे आवाहन पडळकर यांनी केले. आता राज्यभर वीजतोडणीच्या विरोधात आपण आंदोलन करणार आहे, असे पडळकर म्हणाले.

(हेही वाचा बिपीन रावत असलेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.