‘जे राजकारण झालं, त्यामुळे मी व्यथित’; सत्यजित तांबे प्रकरणावर थोरातांची पहिली प्रतिक्रिया

109

संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. निवडणुकीपूर्वी काॅंग्रेसने पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आता या सर्व प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठे राजकारण झाले. सत्यजीत या निवडणूकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झाले, ते व्यथित करणारे होते. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोलले पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणे झाले असून योग्य तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवल्याचे काम केले. मात्र, काॅंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढची वाटचालही याच विचाराने होणार आहे, असेही ते म्हणाले. 

(हेही वाचा: शाश्वत धर्म कधीही बदलत नाही – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत )

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.