राऊतांनंतर आता भरत गोगावलेंनी सभागृहातच वापरला ‘तो’ आक्षेपार्ह शब्द; विरोधक भडकले

88

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले असलयाने मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊतांच्या विधानावर सत्ताधारी आक्रमक झाले असून हक्कभंग प्रस्तावच मांडला आहे. दरम्यान, भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना ‘भाडखाऊ’ शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात सभागृह अनेक वेळा तहकूब करण्यात आले.

( हेही वाचा: विधिमंडळाचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केला असेल तर योग्य ती कारवाई करा- अजित पवार )

काय म्हणाले संजय राऊत?

विधीमंडळामध्ये बनावट शिवसेना आहे. हे बनावट चोरांचे मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदे गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असे संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.

भरत गोगावले म्हणाले ‘भाडखाऊ’

संजय राऊत यांच्या विधानावर विधानसभेत बोलताना भरत गोगावले म्हणले की प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असते. प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अती तिथे माती हे ठरलेले आहे. हक्कभंग व्हायलाच पाहिजे. लोकांच्या भावना भडकत आहेत. बाहेर प्रक्षोभक वातावरण होऊ द्यायचे नसेल तर कारवाई झालीच पाहिजे. या माणसाला अधिकार कोणी दिला? हे स्वत:ला इतके शहाणे समजत आहेत? भाड खायला पाहिजे पण इतका भाडखाऊपणा नको. राऊत यांच्यावर कारवाई करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.