जितेंद्र आव्हाडांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त विधानावर बावनकुळे संतापले; म्हणाले…

87

मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधानसभेत देखील पाहायला मिळाले. सध्या या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला जात आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात जातीवाद हा राष्ट्रवादी काँग्रेसने तयार केल्याचे बावनकुळे म्हणाले.

‘जितेंद्र आव्हाड हा विकृत मनस्थितीचा व्यक्ती’

सोमवारी प्रसार माध्यमांसोबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हा विकृत मनस्थितीचा व्यक्ती आहे. किती वेळा तरी त्यांनी अशाप्रकारचे हिंदु आणि सनातनविरोधी विधान करून विकृतपणाचे लक्षण दाखवले आहे. जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या समाजातील भावना बिघडवण्याचे काम करण्यात येत आहे. जातीपातीचे राजकारण करून धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून मत मिळवणे हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाडाचे काम आहे.

पुढे बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात जातीवाद कोणी तयार केला? तर राष्ट्रवादी काँग्रेसने केला. पुढच्या काळातही मुस्लिम समाजाला सांगणे तुमच्या विरोधात भाजप आहे, मागासवर्गीयांना सांगणे की, भाजप आले तर तुमचे संविधान बदलतील. महाराष्ट्रात, देशामध्ये या जातीयवादी शक्ती खऱ्या आहेत. आणि अशा प्रकारची वक्तव्य करणे ही जातीयवादी शक्तीचे लक्षणे आहेत.

(हेही वाचा – कुणाचे हॉटेल सिंगापूर, लंडन, अमेरिकेत आहे, सगळे एक दिवस महाराष्ट्रासमोर आणणार; रामदास कदमांचा इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.