बच्चू कडू नक्की कुणाचे समर्थक आमदार? फडणवीसांनी केला खुलासा 

82

सध्या आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना त्या दोघांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली, आता त्या दोघांमध्ये समेट झाला आहे, असे सांगताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार कडू हे केवळ माझ्या एका फोनवरून गुवाहटीला गेले होते, मी फक्त कडू यांनाच गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केला होता, असा खुलासा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

बच्चू कडू एकटे माझ्या फोनवरून गुवाहाटीला गेले होते

बच्चू कडू यांना आपण फोन करून गुवाहाटीला जाण्यासाठी विनंती केली होती. आम्ही आमचे सरकार स्थापन करत आहोत, त्याकरता आम्हाला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही गुवाहाटीला जा, असे आपण कडू यांना सांगितले होते, त्यानुसार ते गुवाहाटीला गेले. बच्चू कडू एकटे माझ्या फोनवरून गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर खोक्यांचा आरोप करणे चुकीचे आहे. बाकी जे आमदार गुवाहाटीला गेले, ते एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गेले होते. त्यांना परिणामांची जाणीवही होती, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा २ वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणणार! – देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास)

रवी राणा, बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला 

रवी राणा आणि कडू यांची मी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली. तेव्हा रवी राणा यांनी आपण बच्चू कडू यांनी आपल्यावर टीका केल्यामुळे रागाच्या भरात त्यांच्यावर टीका केली, असे मान्य केले.  तसेच कडू यांनीही रागाच्या भरात बोलल्याचे मान्य केले आहे. आता दोघांनीही विकासाच्या कामांवर लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांच्यातील वाद मिटला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.