Ashish Shelar : …शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..!; ॲड. आशिष शेलार यांची उबाठावर टीका

आशिष शेलार म्हणाले की, उबाठा गटाचा गल्लीत "गोंधळ" आणि दिल्लीत काँग्रेस समोर "मुजरा" सुरु आहे. त्यावर प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतील काही समर्पक शेर... आशिष शेलार यांनी वाचून दाखवला आहे.

100
Ashish Shelar : भाजपाने देशात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर राजकारण सोडाल का...; आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

उबाठा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेस समोर मुजरा सुरू आहे अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यासाठी आशिष शेलार यांनी प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतील शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..! या शेरचा दाखल देत उबाठा गटावर शरसंधान साधले. (Ashish Shelar)

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, उबाठा गटाचा गल्लीत “गोंधळ” आणि दिल्लीत काँग्रेस समोर “मुजरा” सुरु आहे. त्यावर प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतील काही समर्पक शेर… आशिष शेलार यांनी वाचून दाखवला आहे. (Ashish Shelar)

अखेर अपुला कसाबसा ते तंबू टाकुन आले
त्याच्या आधी किती जणांच्या दारी जाउन आले!

वावटळींच्या मागे मागे जे जे धावत होते
घरी परतले तेव्हा नुसती वाळू घेउन आले

समजत नाही, या लोकांना भूक लागली कसली
हवेत गेले, हवा शिजवली, हवाच खाउन आले

आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती
शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले

अशा शब्दांत त्यांनी उबाठावर हल्लाबोल केला. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Per Capita Income : २०३१ पर्यंत भारतीयांचं डरडोई उत्पन्न किती असेल?)

मुजर्‍यांची वरात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज

आशिष शेलार म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये नाव असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय हीन आणि टवाळकीच्या भाषेत टीका करणे ही उबाठा सेनेची संस्कृती आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत बोलणाऱ्यांना महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कधीही स्थान दिलेले नाही. ज्या भाषेत तुमचे राजकीय प्रवक्ते बोलत आहेत ती तुम्हाला मान्य आहे का, हा उद्धवजींना सवाल आहे असेही ते म्हणाले. कधी स्व. अहमद पटेल, कधी राहुल गांधी, कधी पवार साहेब, कधी ममता बॅनर्जी तर कधी केजरीवाल…मुजर्‍यांची वरात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे असाही टोला आशिष शेलार यांनी लगावला. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये वंचित आघाडीवरून नव्या वादाची ठिणगी?)

‘मनी’ लूटो गँगचे ते मुखिया..

मणिपूरवर बोलल्यावर कुठून तरी ‘मनी’ नावाचा पूर त्यांच्याकडे येईल असे उबाठा गटाला वाटत असावे कारण महापालिकेत ‘मनी’ लूटो गँगचे ते मुखिया होते. मणिपूर तर दूर आहे आधी त्यांनी मुंबईत मालवणीला जावे, पेट्रोलचा खर्च आम्ही करायला तयार आहोत असेही आशिष शेलार म्हणाले. (Ashish Shelar)

महाराष्ट्र निवडणूक समिती प्रमुख आढावा बैठक संपन्न

महाराष्ट्र निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, सह प्रभारी निर्मल कुमार सुराणा, सह प्रभारी जयभान सिंह पवैया, महाराष्ट्र निवडणूक समिती प्रमुख श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईची निवडणूक आढावा बैठक मुंबई भाजपा कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत प्रत्येक बूथवर ३७०+ मतांचे नियोजन करण्याबाबत नियोजन व तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला भाजपा खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, लोकसभा निवडणूक प्रमुख, जिल्हा निवडणूक प्रमुख, लोकसभा प्रभारी, लोकसभा विस्तारक, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा प्रभारी आणि विधानसभा विस्तारक उपस्थित होते. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.