निधी वाटपातील दुजाभाव हा लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय – अंबादास दानवे

117
निधी वाटपातील दुजाभाव हा लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय - अंबादास दानवे

सत्ताधारी पक्षाकडून निधी वाटपात दुजाभाव करणे, हा लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी (२४ जुलै) केला.

विधानपरिषद सभागृहात बोलताना दानवे म्हणाले, विधानपरिषदेच्या आमदारांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं सांगितलं. मात्र ते सपशेल चुकीचे आहे. निधी वाटपाची रक्कम ही जनतेच्या करातून वसूल करून दिली जाते. ज्या मतदारसंघात निधी दिला नाही तेथील जनता कर भरत नाही का? त्यांना विकासाचा अधिकार नाही का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा – ‘एनडीआरएफ’चा बेसकॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार)

सरकारने खुलासा करावा

असमान निधी वाटप झाले की नाही, याबाबत सरकारने खुलासा करावा. तसेच सर्व आमदारांना समान निधी वाटपाबाबत धोरण आखणार का, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणावर अन्याय होणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.