डिजीटल इंडिया… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली देशाच्या विकासासाठी बघितलेलं एक स्वप्न. 1 जुलै 2015 रोजी डिजीटल इंडिया मोहीमेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी डिजीटल इंडियाचे महत्त्व पटवून सांगितले होते. व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. डिजीटल इंडियाच्या माध्यमातून देशातील प्रत्येकाला सक्षम करण्याचे मोदींनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. आता डिजीटल इंडिया मोहिमेला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. या 6 वर्षांत भारताने डिजीटल युगात असामान्य क्रांती घडवली आहे.
कोविड काळात डिजीटल युगाचे अनेक फायदे आपल्याला जाणवले. या काळात सर्वाधिक पैशांचे व्यवहार हे डिजीटल पेमेंटद्वारे करण्यात आले. 2020मध्ये भारत डिजीटल व्यवहारांत जगात अव्वल स्थानी आला आहे. मार्च 2021मध्ये तर 172.81 लाख करोड रुपयांचे डिजीटल व्यवहार झाले आहेत. 2016-17 या आर्थिक वर्षात 1 हजार 4 करोड रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाले होते, ते वाढून 2019-20 या आर्थिक वर्षात ते 5 हजार 475 करोड रुपयांपर्यंत वाढले आहेत.
#DigitalIndia | Unprecedented growth witnessed in Digital Payments Transactions. Did you know that India ranked 1st in digital payment transactions globally in 2020? pic.twitter.com/FBf9jkRJvL
— Ministry of Electronics & IT (@GoI_MeitY) July 1, 2021
(हेही वाचाः देशभरात ७३ लाख लसींच्या मात्रा शिल्लक!)
कोविड काळात असाही झाला डिजीटल वापर
कोविड-19शी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा भारताने चांगला वापर करुन घेतला. कोविडबाधित रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी आरोग्य सेतू या जगातील सर्वात मोठ्या कोविड-19 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅपची निर्मिती करण्यात आली. 19.51 करोड भारतीय हे अॅप सध्या वापरत असून, त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या कोविडबाधित रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी त्यांना या अॅपची मदत होत आहे. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने गोळा करण्यासाठी आरटीपीसीआर अॅपचीही भारताने निर्मिती केली आहे. 25 एप्रिलपर्यंत 16 करोड लोकांचे नमुने या अॅपद्वारे गोळा करण्यात आले आहेत.
कोविनची निर्मिती
जानेवारी 2021 भारतात लसीकरण मोहिमेला सरकारकडून सुरुवात करण्यात आली. लसीकरणामध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी आणि जास्तीत-जास्त भारतीयांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी सरकारने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा वापर करुन, डिजीटल इंडियाची दखल जगाला घ्यायला भाग पाडले. जगातील दुस-या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण नोंदणीसाठी कोविन पोर्टलची सरकारकडून निर्मिती करण्यात आली. आतापर्यंत 35 करोड भारतीयांनी यामार्फत लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे नॅनो पार्टिकल कोटेड मास्कची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे.
टीकाकरण के लिए भारत के COWIN app में भी अनेकों देशों ने दिलचस्पी दिखाई है।
वैक्सीनेशन की प्रक्रिया के लिए ऐसा Monitoring tool होना हमारी तकनीकी कुशलता का प्रमाण है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 1, 2021
मोदींनीही व्यक्त केला विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डिजीटल इंडियाच्या प्रगतीबद्दल गौरवोत्गार काढले आहेत. आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवण्यापासून सर्व प्रकारची सरकारी कामे, कर भरणा यांसारखी अनेक कामे सध्या डिजीटली होत आहेत.
ड्राइविंग लाइसेंस हो, बर्थ सर्टिफिकेट हो, बिजली का बिल भरना हो, पानी का बिल भरना हो, इनकम टैक्स रिटर्न भरना हो, इस तरह के अनेक कामों के लिए अब प्रक्रियाएं डिजिटल इंडिया की मदद से बहुत आसान, बहुत तेज हुई है।
और गांवों में तो ये सब, अब अपने घर के पास CSC सेंटर में भी हो रहा है: PM
— PMO India (@PMOIndia) July 1, 2021
कोरोना काल में डिजिटल इंडिया अभियान देश के कितना काम आया है, ये भी हम सभी ने देखा है।
जिस समय बड़े-बड़े समृद्ध देश, लॉकडाउन के कारण अपने नागरिकों को सहायता राशि नहीं भेज पा रहे थे, भारत हजारों करोड़ रुपए, सीधे लोगों के बैंक खातों में भेज रहा था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 1, 2021
तसेच पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 10 करोड पेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांनच्या अकांऊंटवर 1 लाख करोड रुपये जमा करण्यात आले आहेत. या दशकात डिजीटल तंत्रज्ञानात भारत जगात सर्वात मोठी क्रांती करेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Communityकिसानों के जीवन में भी डिजिटल लेनदेन से अभूतपूर्व परिवर्तन आया है।
पीएम किसान सम्मान निधि के तहत 10 करोड़ से ज्यादा किसान परिवारों को 1 लाख 35 करोड़ रुपए सीधे बैंक अकाउंट में जमा किए गए हैं।
डिजिटल इंडिया ने वन नेशन, वन MSP की भावना को भी साकार किया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 1, 2021