दोन मुलांना विष देऊन पित्याने केली आत्महत्या! औरंगाबादमधील धक्कादायक घटना

99

पित्याने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या दोन्ही मुलांवर सध्या औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेने संपूर्ण औरंगाबाद शहर हादरले आहे.

( हेही वाचा : भारताने दोन वर्षांत विकसित केल्या चार स्वदेशी लसी! केंद्रीय मंत्र्यांची माहिती)

मुलांना विष का पाजले याचे कारण अस्पष्ट 

मृत पित्याचे नाव भगवंत काळे असे असून त्यांनी आपल्या दोन मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातो असे सांगून विष पाजले आणि भगवंत काळे यांनी स्वत: आत्महत्या केली. ते एका खाजगी कंपनीत कामाला होते. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून लहान मुलांवर उपचार सुरू आहेत.

मृत भगवंत काळे यांनी आपल्या दोन मुलांना विष का पाजले याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. औरंगाबाद पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पित्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.