
-
प्रतिनिधी
Manoj Jarange Hunger Strike End मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापलेले वातावरण आणि सुरू असलेले आमरण उपोषण अचानक मागे घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. उपोषणस्थळी दिवसेंदिवस वाढणारा तणाव, आंदोलकांची आक्रमक भूमिका आणि मुंबईकडे निघण्याचा दिलेला इशारा यामुळे सरकारपुढील पेच चांगलाच वाढला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी सण-उत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून प्रशासकीय व राजकीय पातळीवर पडद्यामागून हालचालींना प्रचंड वेग आला होता. (Manoj Jarange Hunger Strike End)
(हेही वाचा – Indian Women Cricket Team : आशियाई खेळांसाठी महिला क्रिकेट संघ जपानमध्ये दाखल; अमोल मुझुमदारने दिला प्रतिस्पर्ध्यांना इशारा)
या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आणि मध्यस्थांचे प्रयत्न सुरू होते. अखेर एका महत्त्वाच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट दिली आणि दीर्घ चर्चेनंतर काही अटी व आश्वासनांच्या आधारे उपोषण स्थगित करण्यात आले. आंदोलकांनी सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदींसंदर्भात सरकारला ठराविक मुदत दिली असली, तरी ऐन मोक्याच्या क्षणी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Manoj Jarange Hunger Strike End)
(हेही वाचा – UPI MDR, UPI Charges 2026 : युपीआय शुल्काला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, २,००० वरील शुल्क रद्द करण्याची मागणी)
या संपूर्ण घडामोडींमागील सर्वात धक्कादायक आणि रंजक ‘इनसाइड स्टोरी’ आता समोर आली आहे. महाराष्ट्रातील हे वादळी आंदोलन शांत होण्यासाठीची राजकीय सूत्रे चक्क फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून हलवण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत हे दौऱ्यानिमित्त पॅरिसमध्ये असताना त्यांनी तिथूनच रात्रभर फोनवरून सर्व सूत्रे हलवली. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क, गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांशी समन्वय या सर्व बाबी सामंत यांनी पॅरिसमधून थेट हाताळल्या. या यशस्वी शिष्टाईनंतर सरकारी शिष्टमंडळ उपोषणस्थळी पोहोचले आणि पहाटेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. (Manoj Jarange Hunger Strike End)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
