
-
प्रतिनिधी
NCP महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीसह सर्वच पक्षांच्या अंतर्गत गोटात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. या अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता. या निकालांनंतर पक्षाच्या प्रतिमेवर, रणनीतीवर आणि जनतेशी असलेल्या संवादाच्या पद्धतीवर सखोल मंथन सुरू झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा एकदा जनतेच्या मनाशी जोडण्यासाठी आणि जुन्या पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी पडद्यामागे काही गुप्त बैठका आणि व्यूहरचना आखल्या जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. (NCP)
पक्षांतर्गत झालेल्या या मंथनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, केवळ पारंपरिक प्रचारावर अवलंबून राहून चालणार नाही, तर जनतेच्या भावनिक तारा छेडणारा नवा चेहरा आणि नवा सूर समोर आणावा लागेल. गेल्या काही वर्षांत पक्षाची ओळख एकाच नेतृत्वाभोवती केंद्रित झाली होती. मात्र, मतदारांचा कल आणि विशेषतः महिला वर्गाशी असलेला संवाद अधिक दृढ करण्यासाठी पक्षाला नव्या स्वरूपातील ब्रँडिंगची गरज भासू लागली होती. यासाठी देशातील एका नामांकित राजकीय रणनीतीकाराचा सल्ला घेण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या अहवालानंतर पक्षाच्या मूळ प्रचार साच्यातच आमुलाग्र बदल करण्याचे निश्चित झाले. (NCP)
(हेही वाचा – ST Bus Accident: सुपे घाटात एसटी बस उलटली, ८ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर)
या पडद्यामागील घडामोडींचा सर्वात मोठा राजकीय स्फोट आता समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली वर्षानुवर्षे चालत आलेली प्रसिद्ध घोषणा बाजूला सारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या प्रत्येक सभेत आणि कार्यक्रमात घुमणारी ‘एकच वादा, अजित दादा’ ही ओळख आता मागे टाकली जाणार असून, त्याजागी ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ ही नवी अधिकृत टॅगलाईन आणली जात आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुनेत्रा पवार यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे भव्य राजकीय ‘रिलॉन्चिंग’ करण्याची रणनीती आखण्यात आली असून, या नव्या घोषवाक्यासह आता सुनेत्रा पवार यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावाती दौरे आयोजित केले जाणार आहेत. (NCP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
