ICC Cricket World Cup IND VS AUS : सामन्याच्या सुरुवातीला पॅट कमिन्सने केलेले बोचरे विधान पुन्हा झाले व्हायरल 

96

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ICC Cricket World Cup IND VS AUS सामन्यात भारतीय संघावर ऑस्ट्रेलिया भारी पडताना दिसत आहेत. विश्वचषक फायनलच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्याकडून याच पद्धतीचा खेळ खेळला जाणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. भारतात सामना असल्याने स्टेडियममध्ये भारतीय चाहतेच जास्त असतीलच, अंदाजे १ लाख ३० हजार लोक भारताचा जयघोष करत असतील याची आम्हाला कल्पना आहे, पण हे आम्ही स्वीकारले आहे. आणि खरंतर अशा एकतर्फी सामन्यातच स्टेडियममधील फॅन्सना शांत करण्याची गंमत काही औरच असते, अशा आशयाची प्रतिक्रिया पॅट कमिन्सने दिली होती.

कमिन्स म्हणाला की, “इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळल्यानंतर, पाचवेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाला ओळखून आहे. मोठ्या गर्दीसमोर खेळणे ही सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील अनेकांसाठी नवी गोष्ट नाही. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि ग्लेन मॅक्सवेल हे सर्व २०१५ च्या फायनलमध्ये होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने ८० हजारहून अधिक चाहत्यांसमोर MCG येथे न्यूझीलंडचा पराभव केला होता. संघातील बरेच जण आयपीएलही खेळले आहेत.

(हेही वाचा ICC Cricket World Cup IND VS AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य; खडतर परिस्थितीत शेवटपर्यंत खेळले)

ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या तयारीविषयी बोलताना पॅट कमिन्स म्हणाला होता की, एक गोष्ट जी सातत्यपूर्ण राहिली ती म्हणजे संघाचे मनोबल. सर्वच आशावादी आहेत. प्रत्येक जण खेळासाठी तयार आहे. हा सामना आमच्या सर्वांच्याच करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, जेव्हा मागे वळून आजच्या सामन्याकडे पाहू तेव्हा अभिमान वाटू शकतो. नेदरलँड्सविरुद्ध, सामना वगळल्यास आम्हाला कोणतेही मोठे विजय मिळालेले नाहीत. आम्हाला विजय गवसताना खूप अडचणी आल्या पण विजयी कसे व्हायचे हे आम्ही ओळखले आहे. प्रत्येक विजयासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा खेळाडू संघासाठी उत्तम कामगिरी करताना दिसला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.