विरारमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली; तीन महिला कामगारांचा मृत्यू

177
विरारमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली; तीन महिला कामगारांचा मृत्यू
विरारमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली; तीन महिला कामगारांचा मृत्यू

विरार पूर्वच्या मनवेल पाडा रोडवरील सूर्य किरण या इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू असताना भिंत कोसळली. या घटनेत तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. तसेच चार कामगार धिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – बालासोर रेल्वे अपघाताच्या ३ दिवसांनंतर पुन्हा ओडिशात मालगाडीचे ५ डब्बे रुळावरून घसरले)

मंगळवारी, ६ जूनला दुपारच्या सुमारास हे कामगार काम आटपून परतीच्या प्रवासाला निघत होते. त्यामुळे कामगार हात-पाय धुण्यासाठी साचलेल्या पाण्यात गेले असताना बाजूला असलेली भिंती त्यांच्यावर कोसळली. ही घटना लक्षात येताच इतर कामगार आणि नागरिकांनी बचाव कार्य सुरू केली. काही वेळात अग्निशमन पथक दाखल झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त कामगारांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. पण दुर्देवाने उपचारादरम्यान तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत जखमी झालेल्या एका कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.