Swatantra Veer Savarkar: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष शोचे अभिनेते-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून आयोजन

दिग्पाल लांजेकर यांनी मातृसंस्था स्वरुपवर्धिनीच्या १५० वर्धकांना हा चित्रपट स्वखर्चाने दाखवला.

142
Swatantrya Veer Savarkar : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे, तर आपल्या कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार, प्रसार कायम करीत असतात. ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून ज्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला, त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अलौकिक कार्य आणि विचार भावी पिढी समोर यावे, याकरिता अभिनेते, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन पुण्यातील ‘स्वरुपवर्धिनी’ या आपल्या मातृसंस्थेसाठी नुकतेच केले. दिग्पाल लांजेकर यांनी मातृसंस्था स्वरुपवर्धिनीच्या १५० वर्धकांना हा चित्रपट स्वखर्चाने दाखवला.

याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी वीर सावरकरांवर चित्रपट काढावा, अशी आशा व्यक्त केली. केवळ एका चित्रपटातून वीर सावरकरांचे विचार पोहोचवणं शक्य नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अनेक पैलू समोर येणं गरजेचं असल्याचं मत रणजित सावरकर यांनी व्यक्त केलं. ‘शिवनीती’च्या मदतीनेच सावरकरांनी आपल्या देशभक्तीची वाटचाल केली, असं सांगत, ‘शिवराज अष्टका’प्रमाणे सावरकरांवरील चित्रपटाची ‘पंचक’ मालिका दिग्पालने करावी, अशी इच्छा सात्यकी सावरकर यांनी यावेळी बोलून दाखविली. देशाला घडविण्यासाठी वीर सावरकर यांच्या विचारांची ताकद आजच्या पिढीला समजणं आवश्यक आहे, असे सांगताना ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट ती ताकद तुमच्यात निर्माण करेल, असा विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Sharad Pawar Group : शरद पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर)

सिनेमाच्या विशेष शोसाठी पुढाकार

‘विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे’ हे ‘स्वरूपवर्धिनी’चे ध्येयवाक्य आहे. या ध्येयवाक्याला जागूनच छत्रपतींच्या आशीर्वादाने पुढच्या पिढीला ‘वीर सावरकर’ हा विचार समजून घेता, यावा याकरिता या सिनेमाच्या विशेष शोसाठी पुढाकार घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.

पुणे शहराच्या पूर्व भागातील नागरी वस्ती-झोपडपट्टी परिसरातील मुलामुलींच्या विकासासाठी झटणारी ‘स्वरुपवर्धिनी’ ही पुण्यातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेतर्फे व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे, मुलामुलींवर देशभक्तीचे व समाजसेवेचे संस्कार रुजविणे, हे ‘स्वरूपवर्धिनी’चे उद्दिष्ट आहे. या विशेष शोला सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा श्रीमती मंजिरी मराठे, स्वरुपवर्धिनीचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, संस्थेच्या सहकार्यवाह आणि महिला विभाग प्रमुख मंजुषा कुलकर्णी, महिला विभागाच्या पालक पुष्पा नडे आदि मान्यवर उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.