१६ नोव्हेंबरला ‘या’ भागात १२ तास येणार नाही पाणी!

133

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धिकरण केंद्र येथील एच.टी सबस्टेशन मधील तांत्रिक दुरुस्तीसाठी अणे शहरातील विविध ठिकाणच्या जलवाहिनींची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच जयभवानीनगर स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अंतर्गत बाधित होणाऱ्या जलवाहिन्या व पंपिंग स्टेशनच्या उच्चदाबाचे पॅनल्स् स्थंलातरित करण्यात येणार आहे, असल्याने बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत १२ तासांचा ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?)

या भागात येणार नाही पाणी पुरवठा

बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत १२ तासांसाठी ठाणे शहरातील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर भागात पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच ठाणे शहरातील उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु राहील.

पालिकेस सहकार्य करावे…

वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.