Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला.

155
Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे. तर दुसरीकडे नांदेड येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Unseasonal rain : सततच्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’)

या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे. लासलगाव सह निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपिटीमुळे गेल्या काही दिवसापासून नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतकरी पुरता हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाकडून अजून पर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही. या अवकाळी पावसामुळे बळीराजा ची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून लासलगाव परिसरात कधी मध्यम तर कधी जोरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील कांद्याचे पोळ पाण्याखाली गेले आणि शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

हेही पहा –

सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान शेतकरी ने करावे काय? असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.