ISIS In Padgha : आतंकवाद्यांचा बालेकिल्ला बनलेले गाव; पडघा-बोरिवली

Padgha-Borivali : २००२-०३ च्या मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या १३ दहशतवाद्यांमध्ये पडघ्यातील पाच रहिवाशांचा समावेश होता. त्यावेळी पडघा गाव हे देशाच्या नकाशावर आले होते.

1037
Padgha-Borivali : आतंकवाद्यांचा बालेकिल्ला बनलेले गाव; पडघा-बोरिवली
Padgha-Borivali : आतंकवाद्यांचा बालेकिल्ला बनलेले गाव; पडघा-बोरिवली

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ७ हजार लोकवस्ती असलेल्या पडघा गावातील बोरिवली (Padgha-Borivali) येथे साकीब नाचन कुटुंबासह राहण्यास आहे. या गावात ८३ टक्के कोकणी मुस्लिम कुटुंबे रहातात. अरुंद वळणाच्या गल्ल्या आणि शतकानुशतके जुन्या घरांनी भरलेले आहे. ज्यांनी देशाच्या सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य इतिहासात भूमिका बजावली आहे.

(हेही वाचा – Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, पाक तज्ज्ञांनी सांगितले या यशामागचे कारण…वाचा सविस्तर)

गजबजलेल्या मुंबई-आग्रा महामार्गापासून दूर असलेल्या पडघाचा उल्लेख शिलाहार राजवंशाच्या काळात इतिहासात आढळतो. सरंजामदार कुळांनी उत्तर आणि दक्षिण कोकण, सध्याच्या मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्रात स्वतःची स्थापना केली होती आणि ७ व्या आणि १० व्या शतकाच्या दरम्यान या क्षेत्रावर राज्य केले होते.

(हेही वाचा – Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, पाक तज्ज्ञांनी सांगितले या यशामागचे कारण…वाचा सविस्तर)

स्वदेशी चळवळीदरम्यान गावाची महत्त्वाची भूमिका

मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकसंख्या असलेल्या या गावात येण्याचा पहिला प्रयत्न अरब या परदेशी नागरिकांनी केला होता. व्यापारासाठी भिवंडी बंदरावर उतरल्यानंतर त्यांनी कालांतराने किनाऱ्यालगत तळ उभारले होते. या अरब व्यापार्‍यांची एक छोटी वस्ती म्हणजेच पडघ्याला लागून असलेली बोरिवली वस्ती. आजच्या घडीला ८३ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेली वस्ती ७ हजार रहिवाशांच्या गावात रूपांतरित झाली आहे.

स्थानिक जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्य चळवळीत येथील स्थानिक मुस्लिम महिलांनी मोलाची भूमिका बजावली होती. स्वदेशी चळवळीदरम्यान येथील महिलांनी घरातून बाहेर पडून बोरिवलीच्या सार्वजनिक चौकात ब्रिटीश वस्तूंची जाळपोळ केली होती.

सिमीचा गड

लोकसंख्येतील ही राजकीय आणि सामाजिक जागरूकता हे देखील कारण आहे की, हे गाव मुस्लिम सक्रियतेसाठी एक सुपीक मैदान होते. ज्यामध्ये कम्युनिस्ट आणि इस्लामवाद्यांना लहान गावात स्थान होते. येथील मुस्लिमांपैकी बरेच जण मोठे जमीनदार आहेत आणि त्यांचा लाकडांचा मोठा व्यापार असल्यामुळे स्थानिक मुस्लिमांचा आर्थिक दबदबा आहे. या समाजाच्या मालकीच्या भक्कम आणि प्रशस्त घरांमधून समाजाची समृद्धी दिसून येते. गावातील अनेक घरे दोन शतकांहून अधिक जुनी आहेत.

पडघा – बोरिवली येथील सुसंपन्न मुस्लिम असूनही कट्टरपंथियांमुळे नापसंतीला आलेले गाव म्हणून पडघ्यावर आरोप आहे. असा दावा करण्यात येतो की, ९० च्या शतकात स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियासारख्या (Students’ Islamic Movement of India) संघटनांनी या शहरामध्ये मजबूत गड बनवला होता. त्या वेळी या संघटनावर बंदी नव्हती, पोलिसांचा दावा आहे की, गावाच्या पलीकडे असलेल्या माहुली आणि कारवा टेकड्यांवरील घनदाट जंगलांचा वापर मुस्लिम तरुणांना स्वयंचलित शस्त्रे चालवणे आणि स्फोटके एकत्र करणे यासह विध्वंसक कारवायांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी केला जात होता.

२००२-०३ च्या मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या १३ दहशतवाद्यांमध्ये पडघ्यातील पाच रहिवाशांचा समावेश होता. त्यावेळी पडघा गाव हे देशाच्या नकाशावर आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.