Mumbai Local: नव्या वर्षात लोकल प्रवास वेगवान होणार, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी ‘ही’ कामे पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

हार्बर मार्गावरील प्रवासात १५ मिनिटांची बचत शक्य होईल.

590
Mumbai Local: नव्या वर्षात लोकल प्रवास वेगवान होणार, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी 'ही' कामे पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय
Mumbai Local: नव्या वर्षात लोकल प्रवास वेगवान होणार, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी 'ही' कामे पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

सीएसएमटी ते पनवेलदरम्यान सध्या ताशी ८० किमी वेगाने लोकल धावतात. या वेगाने सीएसएमटी ते पनवेल अंतर पार  करण्यासाठी ८० मिनिटे लागतात. (Mumbai Local) हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी ताशी १०५ वेग निश्चित करण्यात आला आहे. या वेगामुळे सीएसएमटी ते पनवेल अंतर ६५-७० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्या वर्षात मध्य रेल्वेकडून वेळ बचतीचे गिफ्ट मिळणार आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात १५ मिनिटांची बचत शक्य होईल.

(हेही वाचा – Mumbai Local: अंधेरीतील गोखले पूल उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘या’ लोकल रद्द)

कामे पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेणार…
नव्या वर्षात सुरुवातीचे तीन महिने रेल्वे रुळांचे मजबुतीकरण, रुळांलगत असलेल्या झोपड्या हटवणे आणि ओव्हरहेड वायरमध्ये आवश्यकतेनुसार बदल करणे, ही कामे वेग वाढवण्यासाठी करण्यात येणार आहेत. सीएसएमटी-पनवेलसह सीएसएमटी-बेलापूरदरम्यानच्या प्रवासातही काही मिनिटांची बचत होण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची चाचणीही घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवास वाहतुकीसाठी नवा वेग लागू करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.