मोडकसागर, तानसा पाठोपाठ तुळशी तलावही भरला

103

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा तलावांपाठोपाठ आता तुळशी तलावही ओसंडून भरु वाहू लागले. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तुळशी तलाव भरुन वाहू लागले आहे. त्यामुळे सात पैकी तीन तलाव आता पूर्ण क्षमतेने भरल्याने या सर्व तलावांमधील एकूण पाण्याचा साठा हा ७९ टक्के एवढा झाला आहे.

तुळशी तलावाची ८,०४६ दशलक्ष लिटर क्षमता

मुंबईत दररोज ३८५ कोटी लिटर अर्थात ३,८५० दशलक्ष लिटर एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा शनिवारी, 16 जुलै रोजी सायंकाळी ५:४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार मुंबईकरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला तुळशी हा तिसरा तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लिटर अर्थात ८,०४६ दशलक्ष लिटर इतकी आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

(हेही वाचा ‘शिवबंधन’नंतर शिव’बॉण्ड’; जिल्हाप्रमुखांवर शिवसेनेने दिली जबाबदारी)

७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर

हा तुळशी तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागले होते. तर वर्ष २०२० मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९ मध्ये दिनांक १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी; वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर अर्थात (१४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी असून शनिवारी पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये १ लाख १३ हजार ८०९ कोटी लिटर (११ कोटी ३८ लाख ०९७ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच ७८.६३ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

अप्पर वैतरणा तलाव : पाणी साठवण क्षमतेच्या ६६.८१ टक्के अर्थात १५१६९.९० कोटी लिटर (१,५१,६९९ दशलक्ष लिटर)

मोडक-सागर तलाव: कमाल पाणी साठवण क्षमता ही १२८९२.५० कोटी लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर) इतकी असून हा तलाव १०० टक्के भरलेला.

तानसा तलाव : पाणी साठवण क्षमतेच्या ९९.१८ टक्के अर्थात १४,३८८.७० कोटी लिटर (१,४३,८८७ दशलक्ष लिटर)

मध्य वैतरणा धरण : पाणी साठवण क्षमतेच्या ८१.५५ टक्के अर्थात १५,७८१.८० कोटी लिटर (१,५७,८१८ दशलक्ष लिटर)

भातसा तलाव : पाणी साठवण क्षमतेच्या ७३.८४ टक्के अर्थात ५२,९४९.४० कोटी लिटर (५,२९,४९४ दशलक्ष लिटर)

विहार तलाव : पाणी साठवण क्षमतेच्या ६६.१२ टक्के अर्थात १८३१.३० कोटी लिटर (१८,३१३ दशलक्ष लिटर)

तुळशी तलाव : पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लिटर (८०४६ दशलक्ष लिटर) एवढा पाणीसाठा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.