Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपूरमध्ये तेंगनौपाल जिल्ह्यातील लेटिथू गावाजवळ दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 13 मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेहाच्या जवळ कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत.

162
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू

ईशान्येकडील मणिपूर (Manipur) राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला आहे. राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यात ही घटना घडली. सोमवारी दुपारी दोन्ही बाजूंच्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला. (Manipur Violence)

जिल्ह्यातील लैतिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गोळीबाराची माहिती मिळताच आमचे सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, जिथून आम्हाला 13 मृतदेह सापडले. आम्हाला मृतदेहांजवळ कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत. मृत व्यक्ती स्थानिक रहिवासी असल्याचे दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. असे दिसते की, हे लोक इतर कुठून तरी आले होते आणि गोळीबारात सामील होते.

(हेही वाचा – MHADA : म्हाडाची विकासकांना सवलत)

सात महिन्यांनंतर स्थिती सुधारत असतांना पुन्हा हल्ला 

अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. 3 डिसेंबर रोजी तेंगनौपाल (Tengnoupal) जिल्ह्यातील कुकी-जो आदिवासी गटांनी भारत सरकार आणि यू.एन.एल.एफ. यांच्यात झालेल्या शांतता कराराचे स्वागत केले. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा सात महिन्यांनंतर रविवारी राज्यात मोबाईल इंटरनेट सेवांवरील बंदी उठवण्यात आली होती. काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निर्बंध लागू आहेत. 23 सप्टेंबर रोजी आंतरजालावरील बंदी काही काळासाठी उठवण्यात आली होती; परंतु द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषयुक्त व्हिडिओ संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी मदत करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी ती पुन्हा लागू करण्यात आली.

३ मेपासून उसळला आहे हिंसाचार

‘ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूर’ने (All Tribal Students Union Manipur, ATSUM) 3 मे रोजी ‘ट्रायबल युनिटी मार्च’ काढला. चुराचंदपूरच्या तोरबांग भागात ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाच्या अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात ही रॅली काढण्यात आली होती. मैतेई समाज बऱ्याच काळापासून अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. रॅलीदरम्यान आदिवासी आणि गैर-आदिवासी यांच्यात हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि लष्कर आणि निमलष्करी दलाच्या कंपन्या तेथे तैनात करण्यात आल्या.

(हेही वाचा – देशात गॅरंटीचे दुसरे नाव म्हणजे मोदी; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून PM Narendra Modi यांचे कौतुक)

मैतेई आदिवासी दर्जाची मागणी का करत आहेत ?

मणिपूरमधील 53 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मैतेई (Meitei) समुदायाची आहे. हे गैर-आदिवासी समुदाय आहेत. मुख्यतः हिंदू आहेत. कुकी (Kuki) आणि नागा हे मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के आहेत. राज्यात इतकी मोठी लोकसंख्या असूनही मैतेई समुदाय केवळ खोऱ्यातच स्थायिक होऊ शकतो. मणिपूरचा 90 टक्क्यांहून अधिक भाग डोंगराळ आहे. त्यात केवळ 10 टक्के भागात दळणवळणाची साधने आहेत. डोंगराळ भागात नागा आणि कुकी समुदायांचे वर्चस्व आहे, तर खोऱ्यात मैतेई समुदायांचे वर्चस्व आहे. मणिपूरमध्ये कायदा आहे. या अंतर्गत खोऱ्यात स्थायिक झालेल्या मैतेई समुदायाचे लोक डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकत नाहीत किंवा जमीन खरेदी करू शकत नाहीत. परंतु डोंगराळ भागात स्थायिक झालेले आदिवासी समुदाय कुकी आणि नागा खोऱ्यात स्थायिक होऊन जमीन खरेदी करू शकतात. संपूर्ण मुद्दा असा आहे की, 53 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या केवळ 10 टक्के क्षेत्रात राहू शकते, परंतु 40 टक्के लोकसंख्येचे 90 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर वर्चस्व आहे. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.