Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत किती पडला पाऊस ज्यामुळे होत्याचे नव्हते झाले?

174

बुधवारी, १९ जुलै रोजी रात्री इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशाकीय यंत्रणा तात्काळ कामाला लागली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसेलंली ही वाडी इर्शाळगडावर येणाऱ्या अनेक ट्रेकर्ससाठी आश्रयाचं स्थान होती. मात्र गुरुवारी याच इर्शाळवाडीला आश्रयाची गरज आहे. याच इर्शाळवाडीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये  770 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

पण या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचं सावट आलं. या दुर्घटनेमध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेचे बचाव कार्य करताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा देखील मृत्यू झाला आहे. जवळपास 100 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक जण या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रशासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(हेही वाचा Landslides : बारा वर्षांपासून मुंबईत दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना नाही)

तळीयेमध्ये 5  दिवसांत  550 मिमी बरसला

रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात तळीये गावामध्ये 22 जुलै 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता दरड कोसळली होती. अवघ्या 24 तासात हे गाव मातीच्या ढीगाऱ्याखाली गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं. . दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली.तळीयेमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.