Kalwa Hospital : कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा; मुलाने गमावला हात

Kalwa Hospital : छत्रपती शिवाजी रुग्णालयात गेल्यानंतर पालकांना अधिकच धक्कादायक अनुभव आला. डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता व धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावले आणि शनिवारी येण्यास सांगितले. परंतु शनिवारपूर्वीच आयुषच्या हाताची बोटे काळी निळी पडली.

240
Kalwa Hospital : कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा; मुलाने गमावला हात
Kalwa Hospital : कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा; मुलाने गमावला हात

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे एका चिमुरड्याला आपला हात गमवावा लागला आहे. (Kalwa Hospital)

(हेही वाचा – ‘Virat Kohli Spat on Me’ : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरने विराट कोहली त्याच्यावर थुंकल्याची आठवण काढली आहे)

भिवंडीतील 12 वर्षीय मुलगा क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हात गमावावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नयावस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आयुष शर्मा या मुलाचे मोठे नुकसान झाले आहे.

जखम स्वच्छ न करता थेट लावले प्लास्टर 

रविवार, 24 डिसेंबर रोजी आयुष क्रिकेट खेळतांना पडला. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेले. या वेळी तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

छत्रपती शिवाजी रुग्णालयात गेल्यानंतर पालकांना अधिकच धक्कादायक अनुभव आला. डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता व धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावले आणि शनिवारी येण्यास सांगितले. परंतु शनिवारपूर्वीच आयुषच्या हाताची बोटे काळी निळी पडली. भीतीपोटी राकेश यांनी पुन्हा कळवा रुग्णालयात (Kalwa Hospital) धाव घेतली असता डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषच्या हाताला धनुर्वात झाल्यामुळे हात खांद्यापासून बाजूला केला.

(हेही वाचा – Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती; आतापर्यंत ‘इतका’ टोल वसूल)

वडिलांचे आरोप

आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी कळवा रुग्णालयातील डॉक्टरांविषयी संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाला हात गमवावा लागल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी राकेश शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मदतीने आयुक्तांकडे धाव घेतली आहे. तसेच न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणी जेजे रुग्णालयामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. आठवड्याभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. कळवा रुग्णालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करावा आणि नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा रविंद्र मोरे यांनी दिला आहे. (Kalwa Hospital)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.