मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड; मिळणार ४० हजारापर्यंत पगार

72

मुंबई विद्यापीठात रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२२ असणार आहे.

( हेही वाचा : सप्टेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल; सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणार परिणाम )

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य कार्यकारी अधिकारी व कनिष्ठ अभियंता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसारा इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्रीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार – मुख्य कार्यकारी अधिकारी – ४० हजार प्रतिमहिना आणि कनिष्ठ अभियंता ४० हजार प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर

अधिसूचना – Mumbai Vidyapeeth Recruitment 2022

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.